Mamta Shrikant Sarwade

Mamta Shrikant Sarwade

Share

"Dream. Believe. Achieve." "Sunshine mixed with a little storm ��"
"Spreading smiles wherever we go �"

22/06/2026

गरिबांनाच जात-धर्म का? 🧐
निवडणुका आल्या की सर्वसामान्य जनतेला जातीपातीची आठवण करून देणारे मोठे नेते स्वतःच्या घरात सोयरिक करताना कोणता फॉर्म्युला वापरतात? आज हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य तरुणांना पडलाय!
सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात जातीच्या आणि पक्षाच्या भिंती अचानक कशा गायब झाल्या? एका बाजूला जाहीरपणे एकमेकांवर टीका करणारे राहुल गांधी आणि गौतम अदानी पवारांच्या सोफ्यावर शेजारी बसून जेवणाचा आनंद घेतात, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कार्यकर्ते पक्षासाठी आणि नेत्यांसाठी एकमेकांशी वाद घालत बसतात!
अजित दादांच्या घरात नुकतीच शोकांतिका झालेली असताना, या लग्नात झालेला जल्लोष आणि सुप्रिया सुळेंना शाहरुख खानने दिलेली भेट... नेत्यांचा हा पडद्यामागचा खरा गेम आणि स्टेटसचे राजकारण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा!
तुम्हाला काय वाटतं? श्रीमंतांच्या जगात जात नाही तर फक्त 'पैसा आणि स्टेटस हवं '
बाहेर ब्राह्मण ब्राह्मण म्हणून लोकांना शिव्या घालायला लावायच्या आणि घरात मात्र ब्राह्मण सुना आणायच्या आणि स्वतःच्या घरातील मुली मराठा समाजात न देता परजातीत द्यायच्या.
सुब्रमण्यम स्वामी ची बायको कुठल्या जातीची आहे? त्यांच्या मुलीने कुठल्या जातीच्या मुलासंग लग्न केले आहे. हे माहिती करुन घ्या. त्यांच्या घरात पुर्ण भारत आहे. मोहन भागवत आरएसएस चे प्रमुख यांची भाचीने मुसलमान मुलाचे लग्न केलेले आहे प्रवीण तोगडिया च्या मुलीने पण मुसलमान मुलाबरोबर लग्न केलेला आहे. मुरली मनोहर जोशी च्या मुलीने पण मुसलमान मुलाबरोबर लग्न केलेला आहे. सलमान खान च्या कुटुंबाचे ही तसेच.

ये बात कुछ हजम नही हुई!

©Mamta Shrikant Sarwade

22/06/2026

आजच्या काळात धर्माच्या नावावर भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो. अशा वेळी भिवंडी (महाराष्ट्र) येथे घडलेली ही घटना माणुसकी, प्रेम आणि बंधुत्वाचा एक सुंदर संदेश देऊन जाते.
NEET परीक्षेसाठी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनाही कडक उन्हाचा आणि प्रतीक्षेचा सामना करावा लागत होता. हे पाहून दारुल उलूम दीनियत आणि स्थानिक मशिदीच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत मशिदीचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. कोणता धर्म, कोणती जात किंवा कोणती भाषा याचा विचार न करता पालकांच्या विश्रांतीची, निवासाची, थंड पाण्याची, चहा-नाश्त्याची आणि आवश्यक सोयींची व्यवस्था करण्यात आली.
हा पाहुणचार केवळ सेवा नव्हती, तर भारतीय संस्कृतीतील "अतिथी देवो भव" आणि मानवतेच्या मूल्यांचे जिवंत उदाहरण होते. अनेक पालकांसाठी ही मदत अनपेक्षित होती. परंतु ज्यावेळी परीक्षा संपली आणि परत जाण्याची वेळ आली, तेव्हा अनेकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते. काही हिंदू पालकांनी मशिदीच्या अधिकाऱ्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचे मनापासून आभार मानले. त्या क्षणी धर्म, जात, पंथ या सर्व सीमा विरघळून गेल्या आणि फक्त माणुसकी उरली.
आपल्या देशाची खरी ताकद ही विविधतेत आहे. एकमेकांचा आदर, संकटात मदतीचा हात आणि निस्वार्थ सेवा हीच भारताची ओळख आहे. समाजात द्वेष पसरवणाऱ्या घटनांपेक्षा अशा हजारो सकारात्मक घटना जास्त घडतात, पण त्या अनेकदा प्रकाशझोतात येत नाहीत. भिवंडीतील ही घटना मात्र आपल्याला आठवण करून देते की प्रेम, करुणा आणि बंधुत्व यांच्यापुढे कोणतीही भिंत टिकू शकत नाही.
धर्म शिकवतो श्रद्धा, पण माणुसकी शिकवते एकमेकांसाठी जगायला. आणि जेव्हा माणुसकी जिंकते, तेव्हा संपूर्ण समाज जिंकतो.

©Mamta Shrikant Sarwade

#माणुसकी #भिवंडी #बंधुत्व #एकता #सामाजिकसौहार्द

22/06/2026

पतीची किडनी निकामी, पण हार मानली नाही! जालना जिल्ह्यातील सीमाताईंची द्राक्षशेतीतील प्रेरणादायी संघर्षगाथा
जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संकटांवर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या महिलांची अनेक उदाहरणे आपण पाहतो. अशाच प्रेरणादायी महिलांपैकी एक म्हणजे जालना जिल्ह्यातील कडवंडी गावच्या सीमा क्षीरसागर. आयुष्यात अचानक आलेल्या मोठ्या संकटाला न घाबरता त्यांनी केवळ आपल्या कुटुंबालाच नव्हे तर शेकडो महिलांना प्रेरणा देणारा आदर्श निर्माण केला आहे.
सन २०१३ मध्ये सीमा यांचा विवाह सदानंद क्षीरसागर यांच्याशी झाला. कुटुंबाकडे साडेचार एकर हलकी जमीन होती. शेतीविषयी विशेष आवड असलेल्या सदानंद यांनी कृषी पदविका पूर्ण केली होती. आधुनिक शेतीच्या संकल्पना आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी २०१५ मध्ये एक एकर द्राक्षबाग उभारली. शेततळ्याची निर्मिती केल्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढली आणि द्राक्षबागेचे उत्पादनही चांगले मिळू लागले. कुटुंबाचे जीवन सुरळीत सुरू होते.
परंतु नियतीने अचानक वेगळेच आव्हान समोर ठेवले. सदानंद यांची प्रकृती खालावू लागली आणि तपासणीत त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समोर आले. उपचारांसाठी मोठा खर्च, सततचे रुग्णालयाचे फेरे आणि कुटुंबाची जबाबदारी यामुळे संपूर्ण कुटुंबावर संकटाचे डोंगर कोसळले. अखेर त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची वेळ आली.
अशा कठीण काळात अनेकजण खचून गेले असते, परंतु सीमाताईंनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. पतीच्या उपचारांची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी शेतीची संपूर्ण धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. सुरुवातीला शेतीतील अनेक कामांचा अनुभव नसतानाही त्यांनी शिकण्याची तयारी ठेवली. ट्रॅक्टर चालवणे, औषध फवारणी, द्राक्षबागेची छाटणी, पाणी व्यवस्थापन, मजुरांचे नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास अशा सर्व जबाबदाऱ्या त्यांनी स्वतः पार पाडल्या.
सीमाताईंनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर, जैविक खतांचा समावेश, उत्पादन खर्च कमी करण्याचे प्रयत्न आणि दर्जेदार उत्पादनावर भर यामुळे त्यांच्या द्राक्षशेतीने नव्या उंची गाठल्या. त्यांनी संकटाला संधीमध्ये बदलले आणि शेती अधिक फायदेशीर करून दाखवली.
त्यांच्या या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाची दखल अनेकांनी घेतली. दूरदर्शनच्या प्रसिद्ध ‘कृषीदर्शन’ कार्यक्रमात त्यांच्या कार्याची विशेष नोंद घेण्यात आली. त्यांच्या अनुभवातून अनेक शेतकरी आणि महिला प्रेरणा घेत आहेत.
सीमा क्षीरसागर यांची कथा केवळ एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा नाही, तर ती संकटांशी दोन हात करत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणादायी कहाणी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वास असेल तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
"संकटं माणसाला थांबवण्यासाठी नाहीत, तर त्याची ताकद ओळख करून देण्यासाठी असतात."
सीमाताईंचा प्रवास हेच सत्य पुन्हा एकदा अधोरेखित करतो.

©Mamta Shrikant Sarwade

#सीमाक्षीरसागर #महिलाशेतकरी #द्राक्षशेती #जिद्द #प्रेरणादायीकथा #आत्मनिर्भरमहिला #यशोगाथा #कृषीदर्शन #महिलासक्षमीकरण #शेतकरीप्रेरणा

21/06/2026

"विकासासाठी गेलो" हे वाक्य आता राजकारणातील सर्वात सोयीस्कर स्पष्टीकरण बनलं आहे.
पण विकास हा कोणत्याही मतदारसंघाचा अधिकार असतो, सत्ताधारी पक्षात सामील झाल्याचं बक्षीस नाही.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करणारेही असतील आणि विरोध करणारेही. मात्र खरा प्रश्न पक्षांतराचा नाही, तर मतदारांच्या विश्वासाचा आहे.
मतदारांनी त्यांना एका विशिष्ट विचारसरणीच्या आणि पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून दिलं होतं. आज त्या निर्णयामागे "विकास" हे कारण पुढे केलं जात आहे. मग उद्या देशातील प्रत्येक विरोधी पक्षाचा खासदार आणि आमदार विकासासाठी सत्ताधारी पक्षात गेला, तर लोकशाहीत विरोधकांची भूमिका काय उरेल?
जनता आता घोषणांवर नाही, तर निकालांवर विश्वास ठेवते.
रोजगार किती वाढला? उद्योग किती आले? रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेत नेमका काय बदल झाला?
या प्रश्नांची उत्तरं पुढील काही वर्षांत मिळतील.
कारण राजकारणात पक्ष बदलणं सोपं असतं, पण जनतेच्या मनातील विश्वास टिकवणं खूप कठीण असतं.
आणि अंतिम निर्णय पत्रकार परिषदेत, सोशल मीडियावर किंवा राजकीय सभेत होत नाही...
तो मतदानाच्या दिवशी मतपेटीत होतो.

©Mamta Shrikant Sarwade

21/06/2026

मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चेला रविवारी मूर्त स्वरूप मिळाले. उद्धवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी सायंकाळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून शिंदेसेनेत जाण्याचा त्यांचा निर्णय जाहीर केला.

सध्या राज्याच्या मोठ्या राजकीय घडामोडीच्या केंद्रस्थानी राहिलेले उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे रविवारी दुपारी 4 वाजता त्यांच्या गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी पोहोचले. वडील स्व. पवनराजे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी 5 वाजेपासून बैठकीला सुरुवात केली. मतदारसंघातील औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, बार्शी, परंडा या सहाही विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी टप्प्याटप्प्याने इनडोअर चर्चा केली. विद्यमान स्थिती व कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेत त्यांनी रात्री आपल्या निर्णय जाहीर केला. कार्यकर्त्यांसाठी आपण शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले.

©Mamta Shrikant Sarwade

21/06/2026

"मी 50 नव्हे, तर 500 निवडणुका हरेल... पण हिंदू-मुस्लिम फूट पाडून, खोट्या गोष्टी पसरवून आणि दंगली भडकवून मी निवडणुका जिंकणार नाही. राजकारण माणुसकीपेक्षा मोठं नाही."
लोकशाहीचा पाया द्वेषावर नव्हे तर संवाद, समता आणि बंधुभावावर उभा असतो. मतभेद असू शकतात, पण समाजात तेढ निर्माण करून सत्ता मिळवणे हा लोकशाहीचा मार्ग नाही.
राजकारणाचे अंतिम उद्दिष्ट माणसांचे जीवन सुधारण्याचे असावे, समाजात फूट पाडण्याचे नव्हे.

©Mamta Shrikant Sarwade

21/06/2026

हर हर महादेव! ☘️

21/06/2026

"जर एका माजी खासदाराच्या हत्येप्रकरणात न्याय मिळण्यासाठी 20 वर्षे लागतात आणि अखेरीस सर्व आरोपी निर्दोष ठरतात, तर सामान्य नागरिकाला न्याय मिळवणे किती कठीण असेल याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.
भर रस्त्यात गोळ्या झाडून झालेल्या हत्येच्या प्रकरणात तब्बल दोन दशके खटला चालतो, आठ आरोपींवर आरोप ठेवले जातात, आणि शेवटी कोणीच दोषी नाही असे निष्पन्न होते. मग प्रश्न पडतो की हत्या नेमकी कोणी केली? आणि 20 वर्षे न्यायालयीन प्रक्रिया नेमकी कशावर चालली होती?
दोन्ही बाजू आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे त्यांनी इतकी वर्षे खटला लढवला. पण एखादा सामान्य माणूस 20 वर्षे न्यायासाठी संघर्ष करू शकेल का? आणि दोन दशकांनंतर मिळालेला निकाल हा न्याय म्हणायचा की अन्याय, हा प्रश्न कायम राहतो.
पूर्वीचे जाणते लोक म्हणायचे, 'शहाण्या माणसाने न्यायालयाची पायरी चढू नये.' हे वाक्य का प्रचलित झाले असेल, याचा विचार अशा घटनांमुळे पुन्हा करावा लागतो. न्याय केवळ मिळाला पाहिजे असे नाही, तर तो योग्य वेळी मिळालाही पाहिजे."

©Mamta Shrikant Sarwade

#न्यायव्यवस्था


#माजीखासदारहत्याकांड
#20वर्षांचाखटला
#न्यायासाठीसंघर्ष
#भारतीयन्यायव्यवस्था







#सत्यकाय
#जनतेचेप्रश्न
#लोकशाही
#न्यायमिळालाकाय

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Aurangabad